पत्नीसह २ मुलांचे जीव घेऊन कुटुंब प्रमुखाची गळफास घेऊन आत्महत्या!

पत्नीसह २ मुलांचे जीव घेऊन कुटुंब प्रमुखाची गळफास घेऊन आत्महत्या!

पत्नी आणि आपल्या लहान मुलांचे जीवन संपवून कुटुंब प्रमुखाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पनवेल तालुक्यातील तळोजा परिसरातील शिव कॉर्नर इमारतीत घडली आहे. सदर घटना ही खूप दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.घरमालक भाडे घेण्यासाठी आल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ पवार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.

सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नितेशकुमार उपाध्याय (वय 35) हा आपल्या कुटुंबासमवेत आठ महिन्यांपूर्वी तळोजा फेज 1 मधील शिव कॉर्नर इमारतीत पाचव्या मजल्यावर राहण्यासाठी आला होता. त्याच्या कुटुंबामध्ये पत्नी (वय 30), आठ वर्षीय मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असे कुटुंब राहत होते. दोन्ही मुले तळोजा फेज 1 मधील एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होती.मूळचे उत्तर प्रदेश येथील हे कुटुंब असून तळोजा येथे राहायला येण्यापूर्वी दिल्लीला राहत होते. नितेशकुमारचे नातेवाईक देखील दिल्लीला राहत असल्याचे समजते. नितेशकुमार हा व्यवसाय करीत असे. दोन महिन्यांपासून हे कुटुंब कोणाच्या संपर्कात नव्हते.

घरमालक भारद्वाज हे दोन महिन्यांपासून घरचे भाडे घेण्यासाठी फोन करीत होते. मात्र नितेशकुमार फोन उचलत नव्हता.
शेवटी, शनिवारी घरमालक भारतद्वाज तळोजा येथे पोहचले. दरवाजा उघडून पहिला तर घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी बाहेर आली. काही अनुचित घटना घडली असावी असा अंदाज आल्यावर घरमालकाने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना सांगितले. तात्काळ तळोजा पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पोलीस उपायुक्त अशोक दुधे, तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ पवार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी नितेशकुमारने स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या स्थितीत आढळून आला. पत्नी आणि मुलांची हत्या करून नंतर नितेशकुमारने हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून तळोजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

साधारणतः दीड महिन्यांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ पवार यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे तळोजा परिसरात एकच खळबळ माजली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक दिवस मृतदेह राहिल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. घरमालक भारद्वाज हे दोन महिन्यांपासून घरचे भाडे घेण्यासाठी फोन करीत होते. मात्र नितेशकुमार फोन उचलत नव्हता. शेवटी, शनिवारी घरमालक भारतद्वाज तळोजा येथे पोहचले. दरवाजा उघडून पाहिला तर घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी बाहेर आली. काही अनुचित घटना घडली असावी असा अंदाज आल्यावर घरमालकाने सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना सांगितले. तात्काळ तळोजा पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पोलीस उपायुक्त अशोक दुधे, तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ पवार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.

यावेळी नितेशकुमारने स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या स्थितीत आढळून आला. पत्नी आणि मुलांची हत्या करून नंतर नितेशकुमारने हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून तळोजा पोलीस अधिक तपास करीत आहेत. साधारणतः दीड महिन्यांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ पवार यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे तळोजा परिसरात एकच खळबळ माजली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक दिवस मृतदेह राहिल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

First Published on: February 23, 2020 5:11 AM
Exit mobile version