‘कमळाचे बटण दाबा;काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करा’

‘कमळाचे बटण दाबा;काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करा’

ठाण्यामध्ये शनिवारी उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मौर्य व ठाणे शहराचे उमेदवार संजय केळकर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना निवडणुकीत कमळाचे बटण दाबले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि अनुच्छेद ३७० ला विरोध करण्यांवरही पडतील असे वक्तव्य त्यांनी केले.

गेल्या ७० वर्षांपासून देशाला कीड लागली होती, ती दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अनुच्छेद ३७० ही त्यापैकी एक कीड होती, असे मोर्य यांनी सांगितले. पाकिस्तान सातत्याने अणुबॉम्बच्या धमक्या देत आहे. त्याला चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण दाबले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि कलम ३७०ला विरोध करणाऱ्यांवरही पडेल, असे वक्तव्य मौर्य यांनी केले.

प्रत्येकाने आपल्या आप्तांनाही भाजपलाच मतदान करण्यास सांगायला हवे. मतदान इतक्या मोठय़ा प्रमाणावर व्हायला हवे की मतदान यंत्र हे कमळाच्या चिन्हानेच भरून गेले पाहिजे, असे विधानही त्यांनी यावेळी केले. लक्ष्मी ही कमळातून येते, घडाळ्यातून नाही. घड्याळ बंद पडले आहे. तुम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आता कायमच हद्दपार करायचे आहे.

First Published on: October 6, 2019 12:13 PM
Exit mobile version