चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरून हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरून  हत्या

वडिलांनी केली मुलाची हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या केल्याच्या घटना वारंवार देशात घडत आहे. स्त्रिययांच्या संरक्षणाबाबत कितीही कायदे कडक केले तरी महिलांवरली अत्याचार कमी होताना दिसत नाही. कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन पुन्हा एकदा एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका महिलेची भर रस्त्यात चाकू खोपसून हत्या करण्यात आली होती. ती हत्या देखील चारित्र्याच्या संशयावरुन झाली होती. आता पुन्हा तशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कल्याणातील उंबर्डे परिसरात घडली. रेखा असे मृत महिलेचे नाव आहे. पती विक्रम कुमार हा फरार झाला असून खडकपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

कल्याण येथील वसंत चाळीत पती विक्रम कुमार आणि मृत पत्नी रेखा राहत होते. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरु होते. विक्रम घरी नसताना एक तरुण त्याच्या पत्नीला भेटायला घरी यायचा. हे विक्रमला समजले होते. त्यामुळे तो पत्नीवर सतत संशय घेत होता. पत्नी रेखाचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहे, असा संशय असल्याने त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत. ३० ऑगस्ट रोजी विक्रमने गावी जाण्यासाठी ट्रेनची तिकिट बुक केली होती. पण पत्नी रेखा गावी जायला तयार नव्हती, यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाली होती. या भांडणातून विक्रमने पत्नीचे हात-पाय बांधून तिचा गळा चिरुन खून केला, असं पोलिसांनी सांगितले. खडकपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलीस विक्रमचा शोध घेत आहेत. विक्रमला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत या हत्येचे मूळ कारण काय आहे ते स्पष्ट होणार नाही, असं पोलीस म्हणाले.


हेही वाचा – MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा

First Published on: September 3, 2019 7:27 PM
Exit mobile version