महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या प्रकरणात तीव्र नाराजी व्यक्त करत, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे पत्र अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगतच त्यांनी राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना असल्याचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळेच या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या उच्चस्तरीय चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे.
काय आहे राज ठाकरे यांची मागणी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.— Raj Thackeray (@RajThackeray) March 20, 2021