मुंबईत समूह संसर्ग ओळखण्यासाठी आता ‘सेरो सर्वेक्षण’

मुंबईत समूह संसर्ग ओळखण्यासाठी आता ‘सेरो सर्वेक्षण’

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच या शहरांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे मुंबईत समूह संसर्ग झाला आहे की, नाही हे ओळखण्यासाठी रक्ताचे नमूने तपासून सेरो सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यााठी पालिकेने चेंबूर, शीव, माटुंगा, वडाळा आणि दहिसर या भागांची निवड केली आहे. या भागांतील १२ वर्षांवरील रहिवाशांचे रक्ताचे नमुने घेतले जाणार असून निती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंडल रिसर्च (टीआयएफआर) आणि इतर संस्था हे सर्वेक्षण करणार आहे.

रक्ताचे नमुने तपासणारे सेरो सर्वेक्षण

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा पाच लाखांच्या पुढे गेला आहे. तर सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या ही महाराष्ट्र आणि मुंबईत आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोरोना समूह संसर्ग झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणारे सेरो सर्वेक्षण करावे, अशा सूचना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सर्व राज्यांना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तीन भागांची निवड करुन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या आधी पहिल्या टप्प्यात मुंबईत ५०० जणांचे सेरो सर्वेक्षण करण्यात आले आहे.

असे केले जाणार सर्वेक्षण!

First Published on: June 28, 2020 6:42 PM
Exit mobile version