पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

प्रातिनिधिक फोटो

विरार-नालासोपारा दरम्यान पेंटाग्राम तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहूतक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट हून विरारला जाणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटाच्या उशीरानी धावत आहेत. दुपारचा वेळ असल्याने फलाटावर कमी गर्दी होती. मात्र रेल्वे उशीरा झाल्यामुळे आता फलाटावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. विरारकडे जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत असल्याने विरार लोकला प्रवाशांची गर्दी आहे. दरम्यान विरार नालासोपारा मधील बिघाडाची दखल घेतली असून लववरच बिघाड दुरूस्त केला जाईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रेल्वेच्या पश्चिम मार्गावर उद्या मेगाब्लॉक  अशल्यामुळे कर्मचारी हे काम लवकरच पूर्ण करतील अशी  अशा व्यक्त केली जात आहे.

First Published on: February 23, 2019 1:56 PM
Exit mobile version