नवी मुंबईतील बारमालकाची हत्या; चौघांना अटक

नवी मुंबईतील बारमालकाची हत्या; चौघांना अटक

सुधागड तालुक्यात एक कोटी १४ लाखांचा दरोडा

नवी मुंबईतील बारमालकाची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकच्या बेलनहल्लीजवळच्या कुक्के गावातील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सुमित मिश्रा (२३), अब्दुल शुकूर (३५), अविनाश कारकेरा (२५) आणि मोहम्मद शरीफ (३२) यांना अटक केली आहे.

नेमके काय घडले?

आरोपी सुमित हा माया बारमध्ये काम करत होता. तर इतर तिघे जण एका ट्रॅव्हल कंपनीत कामाला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित आणि वशिष्ठ यांच्यात तीन महिन्यांपूर्वी पैशांवरुन भांडण झाले होते. त्यानंतर त्यांने नोकरी सोडली होती. दरम्यान, सुमित याने वशिष्ठ यांना उडपी येथे बोलावून घेतले आणि त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आली. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांनी कळवले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या कारचा शोध लावत आरोपींना अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे.


हेही वाचा – कुत्र्याच्या भुंकण्याने मालकिणीचा मृत्यू


 

First Published on: February 12, 2020 3:25 PM
Exit mobile version