उद्यापासून मुंबईतून दररोज २५ विमाने उड्डाण घेणार

उद्यापासून मुंबईतून दररोज २५ विमाने उड्डाण घेणार

मुंबई विमानतळ

केंद्र सरकारने २५ मे पासून देशांतर्गत हवाई वाहतूक सेवा सुरु होणार असल्याचे सांगितले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत त्याला अनुकूलता दर्शवली नव्हती. मुंबई रेड झोनध्ये असल्यामुळे विमान सेवा सुरु करायची झाल्यास विमानतळावरील कर्मचारी, त्यांच्या प्रवासाची सुविधा देखील करुन द्यावी लागणार असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. मात्र अखेर मुंबईतून उद्यापासून २५ विमाने उड्डाण घेणार असल्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

First Published on: May 24, 2020 8:20 PM
Exit mobile version