विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी 17 ऑगस्ट 2022 रोजी सुरु झाले. राज्यात सत्ता बदल झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे – फडणवीस(shinde – fadanvis) सरकारची सत्ता स्थापन झाली. मंत्रिमंडळाचा विस्तार ते पावसाळी अधिवेश या दरम्यान राज्यात अनेक घडामोडी घडल्या विरोधी बाकावर बसलेल्या नेतेमंडळींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लबोल केला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विविध मुद्दे समोर ठेवून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली. बॅनर बाजी करत आणि घोषणा देत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्ला बोल केला. पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असूनही विरोधकांच्या घोषणा सुरूच आहेत.