महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालावर विरोधकांना शंका

महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालावर विरोधकांना शंका

धनंजय मुंडे

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला आहे. मात्र, या अहवालावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने देशाचा विकासदर फुगवून सांगितल्याचा आरोप करत, राज्यातील विरोधी पक्षांनी आज महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालाच्या खरेपणावर शंका उपस्थित केली आहे. ‘आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमण्यात यावी‘, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.

भारताचा विकासदर फुगवून सांगितला

जगातल्या प्रसिद्ध अशा १०८ अर्थतज्ज्ञ आणि सांख्यिकी शास्त्रज्ञांनी मार्च २०१९ मध्ये भारतात सध्या जी अर्थविषयक आकडेवारी दिली जात आहे. ती वाढवून सादर केली जाते, असे निवेदन केले होते. त्याचेच समर्थन करणारे विधान केंद्र सरकारने नेमलेले आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी केले होते. त्यांच्या मते सध्याचा भारताचा विकासदर अडीच टक्क्यांनी फुगवून सांगितला आहे. आजचा आर्थिक अहवाल राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. त्यामुळे त्यातील आकडेवारीच्या खरेपणाविषयी संशय व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान, किमान नमुना पध्दतीने ही आकडेवारी वस्तुस्थितीला धरून आहे की नाही हे व्यापक जनहितार्थ तपासून पहावे, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.


हेही वाचा – झटका! धनंजय मुंडे, योगी आदित्यनाथ आणि टीम इंडियाला


 

First Published on: June 17, 2019 2:01 PM
Exit mobile version