तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का ? प्रेमवेड्या तरुणाचे उ्द्धव ठाकरेंना पत्र

प्रेमात पडलेल्या व्यक्तीला प्रेमाशिवाय काहीच दिसत नाही असे म्हणतात. पण हे वाक्य खरे असल्याचं दर्शवणारी घटना हिंगोलीतील एका शेतकरी तरुणाबाबत घडत आहे. कारण प्रेमात आकंठ बुडालेल्या या मजनुने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहले असून आपल्या प्रेमाची कैफीयतच यात मांडली आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे.

काय लिहलय पत्रात?

उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, पत्र लिहताना खुप दुख होत आहे साहेब. तु्म्ही कधी कुणावर प्रेम केलं होत का हो. तुमच महाराष्ट्रावर खुप प्रेम आहे. पण आयुष्यात कधीतरी केल असेल उत्तर द्या. प्रेम हे धन दौलतच मोहताज असते. अहे मी पण कुणावर तरी प्रेम केल होत पण जमीन कमी प्रेमाला विरोध अस असत काहो असा सवालही या तरुणाने उद्धव ठाकरे यांना केला आहे. तुम्हाला भेटून रडावसं वाटतयय कारण तुम्ही सगळ्यांचे प्रश्व सोडवले. मग माझे का नाही. या पुरोगामी महाराषट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो. माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या असे अनेक प्रश्न विचारत या प्रेमवीराने थेट ठाकरेंनाच तुम्ही कुणावर प्रेम केलय का हा प्रश्न विचारला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल असून मुख्यमंत्री पत्राला उत्तर कसे देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

First Published on: April 8, 2022 6:33 PM
Exit mobile version