सामान्यांची कामे मार्गी लावा

सामान्यांची कामे मार्गी लावा

वसई : सामान्य नागरिक हा छोट्याछोट्या गोष्टीने अडचणीत आलेला असतो. अडचणीत आलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांच्याशी नीट वागा आणि त्यांची कामे करा असा कानमंत्र आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नव्याने निवडून आलेल्या सरपंचाना दिला. बहुजन विकास आघाडीने आयोजित केलेल्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, माजी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष बबनशेठ नाईक, माजी खासदार बळीराम जाधव,माजी महापौर प्रवीण शेट्टी, नारायण मानकर,पंचायत समिती सभापती अशोक पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी आमदारांपुढे अनेक समस्या आणि प्रश्न मांडले. त्यावर आमदारांनी उत्तरे दिली. आमदार क्षितिज ठाकूर यांनी सांगितले की, नुसते प्रश्न न मांडता त्याचा पाठपुरावा करत रहा. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य आपले आहेत. त्यांना भेटा. ते आपले प्रश्न नक्की सोडवतील. तिथे प्रश्न न सुटल्यास आमच्याकडे या. आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही आमदार क्षितीज ठाकूर यांनी यावेळी बोलताना दिला. अधिवेशन किंवा महत्वाची कामे सोडल्यास मी कार्यालयात उपलब्ध असतो. त्यामुळे मोकळेपणाने माझ्याकडे प्रश्न मांडा , असे आमदार राजेश पाटील यांनी यावेळी सांगितले

 

First Published on: January 18, 2023 10:08 PM
Exit mobile version