राज्यात गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन सुरु झाला आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास परवानगी आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशानाने जोरदार तयारी केली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांचे ओळखपत्र पाहूनच तिकीट देण्यात येत आहे. मुंबई लोकलही सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकलने प्रवास करु शकणार आहेत. ( छायाचित्र – दीपक साळवी )