गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या गोळीबाराची प्रकरण, गुंडांना मिळणारा राजाश्रय, गुंडाराज महाराष्ट्रात आहे या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भाई जगताप, आमदार अनिल देशमुख यांच्या हातात खेळण्यातील बंदुका असल्याचे पाहायला मिळाले.