गॅबावर ३२ वर्षांत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे आणि कसोटी मालिका जिंकणे या दुहेरी यशाबाबतच्या भावना शब्दांत मांडणे अवघड आहे, असे भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे चौथ्या कसोटीनंतर म्हणाला. पहिल्या कसोटीनंतर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला आणि त्याच्या अनुपस्थितीत रहाणेला भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. या संधीचे रहाणेने सोने करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताची चौथ्या कसोटीतील कामगिरी फारच विशेष ठरली. गॅबावर ऑस्ट्रेलियन संघाला तब्बल ३२ वर्षांनंतर कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. रिषभ पंतची आक्रमक खेळी, तसेच वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर या युवा खेळाडूंच्या अष्टपैलू योगदानांमुळे भारताने हा कसोटी सामना ३ विकेट राखून जिंकला.
Proud to be a part of this unit 🇮🇳 pic.twitter.com/bZZupXEAfE
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 19, 2021
हेही वाचा – बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडे