भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यातील प्रदर्शनावर साऱ्या क्रिकेट चाहत्यांची नजर असते. त्यातही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द.आफ्रिका या देशांमध्ये भारतीय संघ कसा खेळतो यावर संघ किती चांगला आहे हे ठरते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने भारतात चांगले प्रदर्शन केले आहे. पण परदेश दौऱ्यांत चित्र काहीसे वेगळे आहे. भारताला मागील दोन परदेश दौऱ्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. आधी द.आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताचा २-१ असा पराभव केला. तर नुकतीच पार पडलेली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने ४-१ अशी गमावली. त्यामुळे काही खेळाडूंच्या संघातील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी ‘ टाइम्स ऑफ इंडिया ‘ ला दिलेल्या मुलाखतीत खेळाडूंना प्रदर्शन सुधारा नाहीतर नवीन खेळाडूंना संधी देऊ अशी ताकीद दिली आहे.
भारत ‘अ’ संघातून नवे खेळाडू पुढे येत आहेत
इंग्लंड दौऱ्यात संधीचे सोने करू शकलो नाही