Ind vs Aus: गाबा कसोटी विजयाचं पॉलिटिकल कनेक्शन; भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव

Ind vs Aus: गाबा कसोटी विजयाचं पॉलिटिकल कनेक्शन; भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव

भारताने ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि निर्णायक कसोटीत पराभव करत मालिका २-१ अशी खिशात घातली. या विजयासह बॉर्ड-गावस्कर ट्रॉफी स्वत:कडे राखण्यात यश मिळवलं. शिवाय, ऑस्ट्रेलियाला गाबा मैदानावर भारताने पराभूत केलं. गेल्या ३२ वर्षात ऑस्ट्रेलिया गाबा मैदानावर कोणत्याच संघाकडून पराभूत झाला नाही. ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका भारताने पराभूत करत खंडित केली. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजकीय नेत्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. मोदींनी ट्विट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. “भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाने आम्हाला अत्यानंद झाला आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय खेळाडुंमधील उर्जा आणि उमेद प्रकर्षाने दिसून आली. भारतीय खेळाडुंनी दाखविलेला दृढनिश्चय, धैर्य आणि त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी होती. भारतीय संघाचे अभिनंदन, भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा,” असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


हेही वाचा – Ind vs Aus: ‘अजिंक्य’ भारताने कांगारुंना लोळवलं; मालिका २-१ ने खिशात


 

First Published on: January 19, 2021 4:06 PM
Exit mobile version