कसोटी क्रिकेटमध्ये फक्त ड्यूक्स बॉलच वापरा – कोहली

कसोटी क्रिकेटमध्ये फक्त ड्यूक्स बॉलच वापरा – कोहली

विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीने एस जी बॉलवर टीका केली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ड्यूक्स बॉलच वापरण्यात यावा असे म्हटले आहे. भारतामध्ये वापरण्यात येणारा एस जी बॉल लवकर खराब होत असल्याने इंग्लंडमध्ये वापरला जाणारा ड्यूक्स बॉलच सगळीकडे वापरला जावा असे कोहलीचे मत आहे.

एस जी बॉल ५ षटकांतच खराब होतो

राजकोटमधील कसोटी सामन्यानंतर भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने एस जी बॉलवर टीका केली होती. आता कोहली त्याचे समर्थन करताना म्हणाला, “एखादा चेंडू जर ५ षटकांतच खराब होत असेल तर त्या बॉलचा काय उपयोग. सध्या भारतात वापरला जाणारा बॉल लवकर खराब होत आहे. पूर्वी वापरले जाणारे बॉल चांगले होते. पण अचानक काय झाले माहित नाही पण हे चेंडू खराब आहेत. यापेक्षा ड्यूक्स बॉल आणि कुकबुरा बॉल चांगले असतात. ते लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे माझ्यामते ड्यूक्स बॉलच सगळीकडे वापरला पाहिजे.”

 

First Published on: October 11, 2018 11:18 PM
Exit mobile version