भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दोन संघांमध्ये होणाऱ्या आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारीत त्यांच्या पहिल्या पाल्याला जन्म देणे अपेक्षित आहे. मुलाच्या जन्मावेळी अनुष्कासोबत राहण्यासाठी कोहलीने पहिल्या कसोटीनंतर भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीच्या या निर्णयावर काही जणांनी टीका केली असून अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथने कोहलीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
कोहली हा फारच उत्कृष्ट खेळाडू असून तीन कसोटी सामन्यांत भारतीय संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल. कोहलीला ऑस्ट्रेलियात खेळायला किती आवडते हे मला ठाऊक आहे आणि त्याची ऑस्ट्रेलियातील कामगिरी अप्रतिम आहे. मात्र, तोसुद्धा माणूस असून त्याला क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य आहे. त्यामुळे पहिल्या पाल्याच्या जन्मावेळी पत्नीसो