विश्वचषक क्रिकेटच्या उपांत्यफेरीत न्यूझीलंडसोबतच्या सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली, असे असले तरी भारतीय संघाने चिकाटीने दिलेल्या लढतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मात्र, आपल्या वक्तव्याने नेहमी वादात राहणाऱ्या राखी सावंतने मात्र, क्रिकेट संघावर टिका केली आहे. ‘ क्रिकेटर आपल्या बायकांना का घेऊन गेले हा वर्ल्डकप कमी आणि हनिमून कप जास्त वाटतो.’ असे सोशल मीडियावरील व्हिडिओत तिने म्हटले आहे.