‘अन्यथा कोणीच जिवंत राहिलो नसतो’

तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्जवरील ओएनजीसीच्या २७३ कामगारांपैकी १८४ जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे आहे. गेले ११ तास समुद्राच्या पाण्यात लाईफ जॅकेटवर तरंगत राहिलेले कर्मचारी अखेर परतले आहे. ‘नौदलाने वाचविले म्हणून जिवंत राहिलो नाही तर आजचा दिवस पाहिला नसता’, असे म्हणत ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांनी हंबरडा फोडला.

First Published on: May 19, 2021 4:21 PM
Exit mobile version