मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी संपूर्ण मुंबई हादरली होती. मुंबईतील ती काळरात्र आठवली की प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. आजच्या दिवशी 2008 साली मुंबई संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे गजबजून गेली होती. मुंबई स्थिती सामान्य होती. लोकं बाजारात खरेदी करत होते, तर काही लोकं मरीन ड्राईव्हवर रोजच्याप्रमाणे समुद्रातून येणाऱ्या थंड हवेचा आनंद घेत होते. परंतु जसजशी रात्र पुढे सरत गेली मुंबईच्या काही रस्त्यांवर आरडाओरडा सुरू झाला. नेमकं काय घडलं जाणुन घेऊयात