९५ वारकऱ्यांना महाराष्ट्रात परतण्याची परवानगी

उत्तरप्रदेशमध्ये महाराष्ट्रातील ९५ वारकरी लॉकडाऊनमुळे अडकले होते. अखेर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नानंतर त्या वारकऱ्यांना महाराष्ट्रात परतण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या मथुरेमध्ये त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाची मान्यता मिळवली.

First Published on: March 29, 2020 11:05 AM
Exit mobile version