पालघरमधील काही गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर जिल्ह्यातील माहीम-केळवे लघु पाटबंधारे योजनेवरील झांझरोळी धरणाला वर्षभरापासून गळती लागली असून शनिवारी सकाळी दहाच्या सुमाराला या धरणाला भलेमोठे भगदाड पडून गंभीरे परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सिंचन क्षेत्राखालील गावकर्‍यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून याठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.

First Published on: January 9, 2022 11:53 AM
Exit mobile version