हे राज्यपाल आधीच काढले पाहिजे होते – आदित्य ठाकरे

महाराष्ट्राचा अपमान सतत का होतोय, याचा विचार आधी का नाही केला. गेली दीड दोन वर्ष हे राज्यपाल अपमान करत आलेले आहेत. भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल आधीच काढले पाहिजे होते, कारण सतत राज्यपाल महापुरुषांचा अपमान करत होते. राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी जनतेची मागणी आधीपासूनच होती. याचबरोबर जिथं महाराष्ट्राचा अपमान होतोय, तिथं मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. तसेच नवीन राज्यपाल रमेश भैस यांच्यावर मी काही बोलणार नाही, परंतु यांना आपल्याकडे का ठेवलं होतं हा प्रश्न अनुत्तरीत राहिलाय.

First Published on: February 13, 2023 10:56 AM
Exit mobile version