आदित्य ठाकरे यांचा शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा

कर्नाटक सीमावाद पुन्हा ऐरणीवर आला असून त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच मुद्द्यासंदर्भात माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘गुजरात निवडणुकांपूर्वी उद्योग पळवले, आता कर्नाटकमध्येही निवडणूक आहे. आता महाराष्ट्रातील गावं पळवतील,’ असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. राज्यांमध्ये होणाऱ्या प्रोजेक्टसंदर्भात देखील त्यांनी भाष्य करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

First Published on: November 30, 2022 2:20 PM
Exit mobile version