विधानपरिषदेत विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंवर कधी कारवाई करणार असा सवाल करत सचिन वाझेवर कारावई करावी अशी मागणी केली आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख उत्तर देत होते. परंतु विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना योग्य उत्तर मिळाल्यामुळे विधानपरिषदेत गोंधळ निर्माण झाला. या गोंधळानंतर विधानपरिषदेचे कामकाज ५ मिनीट ठप्प करण्यात आले होते.