केंद्राने तयार केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची मदत करणारे नाहीत. शेतकऱ्यांवर लादलेल्या कृषी कायद्यांच्या आम्ही विरोधात आहोत. यासंबंधीची बैठक आज उपमुख्यांत्र्यासोबत पार पडली. बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. आधारभूत किंमती केंद्राच्या कायद्यात नाही ती त्यांना देण्यात यावी असा आमचा आग्रह आहे. राज्यसरकार शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचा कायदा तयार करणार आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.