राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि इतर नेत्यांना जे जमलं नाही ते तीन वर्षात राहुल नार्वेकर यांनी करुन दाखवलं याचे आश्चर्य वाटतय अशा शब्दात अजित पवारांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना अजित पवार बोलत होते.