भाजपच्या तिकिट कापाकापीवर अजितदादा आज सभागृहात बोलले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आमदारांच्या भाषणानंतर अजितदादा बोलले. त्यावेळी संधी मिळताच काही सदस्यांकडून वारंवार सरकार अडचणीत येईल असे सांगतानाच राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा सांगण्यात येतो. त्यांची सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी अवस्था सध्या काही जणांची आहे असे सांगत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तिकीट कापाकापीची अवस्थाही त्यांनी सांगत भाजपला चांगलेच चिमटे काढले.