मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीशी केली आहे. ‘औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवलं होतं. पण ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं. पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले,’ असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाष्य करत ‘या वाचाळवीरांना आवरा’ असं म्हटलंय

First Published on: November 30, 2022 4:59 PM
Exit mobile version