‘दूध का दूध पाणी का पाणी’ व्हायचं बाकी – अंबादास दानवे

उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी म्हटलं की, निवडणूक आयोग म्हणजे सर्वस्व नाही. अजून सुप्रीम कोर्टाकडून निर्णय यायचा बाकी आहे. ‘दूध का दूध पाणी का पाणी’ व्हायचं बाकी कारण निवडणूक आयोग फक्त पक्षाबद्दल बोलू शकतो. परंतु निवडणूक आयोग शिवसेनेच्या संख्येविषयी काय मत व्यक्त करू शकत नाही. तसेच जिथे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असेल तिथेच महाराष्ट्रातील सगळे नेते राहतील. यामध्ये शिवसेना नेत्याच्या मनात काही नाही. अशातच शिवसेना पूर्ण ताकदीने उभी राहणारी संघटना आहे, अशा संकटाला घाबरणारी आमची शिवसेना मुळीच नाही, असंही अंबादास दानवे म्हणालेत.

First Published on: February 18, 2023 1:56 PM
Exit mobile version