कोरोनामुळे आंबोलीतल्या पर्यटन व्यवसायाला फटका

जगभरातील पर्यटकांच आकर्षण असलेल्या आंबोलीत बाराही महिने जवळपास आठ ते नऊ लाख पर्यटक पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी येत असतात. मात्र कोरोना व्हायरसमुळे जे लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे उन्हाळी पर्यटन तर वाया गेलचं आहे. मात्र आता वर्षा पर्यटनावरही कोरोनाचा परिणाम होण्याची भीती येथील पर्यटन व्यावसायिकांना वाटते आहे. कोरोनामुळे वर्षा पर्यटन वाया गेल्यास कर्जाचे डोंगर आणि उपासमारीची वेळ येण्याची भीती येथील पर्यटन व्यवसायिकांना वाटते आहे.

First Published on: April 28, 2020 11:18 PM
Exit mobile version