मुंबई येथील खारघरमधील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर भरदुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात आला मात्र या सोहळ्यानंतर उष्माघातामुळे 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ढिसाळ नियोजनामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप विरोधकांनी केला यासह ‘अमित शाहांना वेळ नसल्याने जर हा कार्यक्रम दुपारी ठेवला असेल, तर विचित्र प्रकार आहे’ अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. नेमकी सध्याची स्थिती काय?, काय घडलं? पाहूयात…