मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी भोंगा, मस्जिद आणि दर्ग्याच्या विषयांवर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर निशाणा साधलाय. मस्जिद, दर्गा, भोंगा ही आमची समस्या नसून शेतकऱ्यांचे प्रश्न ही आमची समस्या आहे, असं मिटकरी म्हणाले.