अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक सत्ताधारी आमने-सामने

राज्याच्या विधीमंडळ पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अयुध वापरण्याची आणि व्यपगत झालेले प्रश्न अतारांकित करण्याची मागणी केली आहे. यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बोलत होते त्यांना बोलू न दिल्याने चांगलेच आक्रमक झाले. यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटलं की, अनिल देशमुख असेच मध्ये बोलत होते आता ते जेलमध्ये जात आहेत. यानंतर सभागृहात विरोधकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्येच चांगलीच खडाजंगी झाली.

First Published on: July 5, 2021 2:19 PM
Exit mobile version