दिल्ली दौऱ्यानंतरची अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुर मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला. तर अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली होती. चार तासाच्या चौकशीमध्ये ईडीच्या पथकाने जुन्या कागदपत्राची पाहणी केली. सोबत अनिल देशमुख यांच्या कुटूंबियांची इतर संपत्तीची नोकरांकडून विचारपूस केली. दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने समन्स दिल्यापासून ते ईडी कार्यालयात पोहचले नाही. तसेच दिल्लीच्या दौऱ्यानंतर मागच्या १५ दिवसानंतर आज ते समोर आले असून त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडी समोर जाणार’, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: July 19, 2021 3:32 PM
Exit mobile version