ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील विजयी

ग्रामपंचायतीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जापासून ते विजयापर्यंतचा अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराचा प्रवास सोपा नव्हता. पण जळगावातील भादली बुद्रुकच्या मतदारांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि विजयश्री अंजलीने खेचून आणली. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची जशी चर्चा झाली, तितकीच काहीशी चर्चा ही अंजली पाटीलचही तिच्या निवडणुक निकालाच्या निमित्ताने सुरू होती.

First Published on: January 18, 2021 8:19 PM
Exit mobile version