अरविंद सावंत यांचे रेल्वे मंत्र्यांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाकडे १९७ गाड्यांची मागणी केली होती. ४० गाड्या आज सोडणार आहेत तर १५७ गाड्यांची आजही मागणी आहे, असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल केलेल्या ट्विटला ते उत्तर देत आहेत. यावर अरविंद सावंत म्हणाले की, आत्तापर्यंत कधीच प्रवाशांची यादी मागितली नव्हती प्रवाशांची यादी पियुष गोयल मागत आहेत. अन्य राज्यांनीही दिल्लीकडे मागणी केली का, आतापर्यंत महाराष्ट्रात ना श्रमिक रेल्वे ना अनेक परप्रांतीय मजुरांसाठी पाठवले त्यांची यादी त्यावेळेस का मागितली नाही, असे सावंत यावेळी म्हणाले. 
First Published on: May 25, 2020 6:57 PM
Exit mobile version