प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मनुष्य नक्की यश मिळवू शकतो. हीच गोष्ट उत्तरप्रदेशातील रिक्षा चालकाच्या मुलीने सत्यात उतरवून दाखवली आहे. उत्तरप्रदेशमध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेली मान्य सिंहने ‘वीएलसीसी फेमिना मिस इंडिया २०२०’ ‘रनर अप’चा किताब पडकला आहे. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले हयात रिजन्सी हॉटेलात झाला होता. सध्या मान्या सिंह सोशल मिडियावरही बरीच ट्रेंड करीत आहे. परंतु मान्याचा मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास इतर स्पर्धकांपेक्षा अगदी खडतर होता. मिस इंडियाच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी तिने आपली स्वप्न कधीच मरू दिली नाही.