सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट सुरु असतानाच आता पुन्हा एकदा देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, जर राज्य सरकारने पुढील तीन ते सहा महिन्यात लसीकरण वाढवले तर तिसरी लाट टाळू शकतो, अशी शक्यता टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केली आहे.