शिधावाटपावरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया

गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, या हेतूने राज्य सरकारने मागीलवर्षी दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा दिला. काही ठिकाणी तो वेळेवर मिळाला. पण, काही ठिकाणी तो उशिरा मिळाला. आता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा देणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली. परंतु गुढीपाडवा एक दिवसावर येऊन ठेपला असला तरी,आनंदाचा शिधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलाच नाही, त्यामुळे विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच शिधावाटपावरून आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: March 21, 2023 12:47 PM
Exit mobile version