विधानसभेतील गोंधळावर भास्कर जाधवांचे स्पष्टीकरण

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. याचं कारण शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे विरोधक चांगलेच संतापले होते. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चुकीचे वक्तव्य केलं असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. राऊतांची चूक लक्षात आणून दिल्यावर जाधवांनीसुद्धा पंतप्रधान मोदींची नक्कल केली. यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली. या सगळ्या प्रकारावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: December 23, 2021 10:39 AM
Exit mobile version