अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबलं, असा गंभीर आरोप केला. भास्कर जाधव यांनी सभागृहात आक्रमक होत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. सचिन वाझे तपास अधिकारी राहिले तर विरोधकांचे बिंग फुटेल याची भिती देवेंद्र फडणवीसांना आहे असा आरोप ही भास्कर जाधव यांनी केला.