आनंदाच्या शिधाबाबत सरकारला संवदेना नाही, भास्कर जाधवांची टीका |

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने राज्यातील 1 कोटी 58 लाख शिधाधारक कुटुंबांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गुढीपाडवा काही तासांवर आला असला तरी आनंदाचा शिधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता मावळत चालली आहे. यावेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आनंदाच्या शिधा वाटपावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दिवाळीला आनंदाचा शिधा मिळाला नाही आणि यावेळी सुद्धा यांना आनंदाचा शिधा द्यायचा नव्हता, असं म्हणत जाधवांनी सरकारवर ताशेरे ओढले.

First Published on: March 21, 2023 1:08 PM
Exit mobile version