आजी घेणार घराचा निरोप

बिग बॉसच्या घरात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, जवळच्या व्यक्तीचे आगमन झाले आणि ती व्यक्ति म्हणजे आजी. इतक्या कमी वेळामध्ये देखील सगळेच सदस्य आजीशी मनाने जोडले गेले. सदस्यांनी आजीसोबत बराच वेळ घालवला, तिच्यासमोर थोडी भांडण झाली, आजीचा खाऊ सगळ्यांनी मिळून खाल्ला, तिच्याशी गप्पा मारल्या. पण आज वेळ आली आहे घरामधून आजीचा निरोप घेण्याची. आजीचा आवाज पुन्हा एकदा आणि शेवटचा घरामध्ये घुमला. आजी म्हणाली, “मला इथे येऊन एक आठवडा झाला सुध्दा. चला म्हणजे आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या आजीला जे काही सांगायचे राहून गेलं असेल ते मला सांगाना.” आजीच्या या घोषणेनंतर प्रत्येक सदस्याला अश्रु अनावर झाले.सगळेच सदस्य अत्यंत भावुक झाले. आणि मीराने आपल्या भावना, खंत, तक्रार आजीसमोर मांडली.

First Published on: October 22, 2021 1:36 PM
Exit mobile version