तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघमध्ये झाले मतभेद…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामुळे बर्‍याच सदस्यांमध्ये मतभेद, भांडण होतं आहे. या आठवड्यात जय मीरा – गायत्रीला आणि मीरा , गायत्री जयला बरंच काही बोलून गेले. ज्याबद्दल गायत्रीने तिचे मत उत्कर्षसमोर मांडले. बिग बॉसची चावडीमध्ये आलेल्या चुगलीनंतर आणि जयच्या वक्तव्यानंतर या चौघांमधील वाद वाढतच चालला आहे. कोणीच कमीपणा घ्यायला तयार नाहीये. उत्कर्ष त्याच्यापरीने गायत्री, मीरा आणि जयला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे हे दिसून येतं आहे. आता या चौघांनंतर स्नेहा आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये देखील मतभेद होताना दिसून येत आहेत. नक्की असे काय घडले ? कोणत्या विषयावरून, कोणावरून नक्की हे घडलं याच्यामागचं नेमकं कारण आजच्या भागामध्ये कळेलच.

First Published on: November 4, 2021 8:00 PM
Exit mobile version