धारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून गांधी शांती यात्रेला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अभिनेत्री नगमा देखील उपस्थित होत्या. भारतात असणाऱ्या हिंदूंकडे भाजपने लक्ष देणं गरजेच आहे. जातीवादी राजकारण करून भाजपला देश विभागायचा आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.