तीन नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने गल्ली ते दिल्ली संताप

तीन नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील गल्ली ते दिल्लीपर्यंत संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारची कोंडी झाली आहे. शिवरायांविरोधात केलेल्या या वक्तव्यामुळे भाजपने अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांची तुलना थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली, तर भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगझेबाची ५ वेळा माफी मागितली, असा दावा केला आहे. यावरुन राज्यातील जनता संताप व्यक्त करत आहे.

First Published on: November 20, 2022 4:30 PM
Exit mobile version