मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी मोठा निर्णय घेत शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आहे. २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. या निर्णयाला भाजपकडूनही पाठींबा देण्यात आला आहे. राज्य सरकारला उशिराचं शहाणपण आलं असं म्हणत शिवसेनेच्या या निर्णयावर आशिष शेलार यांनी टिका करत समर्थन केलं आहे.